उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात, यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार दिनांक 17 ते 21 मे 2016 या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे अथवा काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
काय करावे
काय करू नये
चला तर मग उन्हाची काळजी घ्यायलाच हवी.
-संप्रदा द. बीडकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
View the discussion thread.